शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडून फसवणूक व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगांव(प्रतिनिधी)-तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी एका व्यापाऱ्यास ३१ क्विंटल अद्रक दिली होती मात्र २ वर्ष उलटून सुद्धा पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याची ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत व्यापऱ्यावर गुन्हा दाखल.
याबाबत सविस्तर वृत्त असे की चाळीसगांव तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी प्रदीप पांडुरंग आगोने(वय ४३) हे शेती करून आपली उपजीविका चालवत असून दि २० एप्रिल २०२० रोजी व्यापारी अरुण अशोक कुलकर्णी राहणार गणेशपूर यांना ३१ क्विंटल अद्रक ४ हजार प्रति क्विंटल दराने आगोने यांच्या कडून १ लाख २४ हजार रुपयांना खरेदी करत दि २० जुलै २०२० ला पैसे देणार असल्याचे सांगितले व त्यादिवशी फक्त ३९ हजार रुपये रोख देत ८५ हजार नंतर देतो असे सांगितले मात्र वारंवार मागणी करून सुद्धा उर्वरित रक्कम न देता, रक्कम देत नाही काय करायचे करून घे असा दम दिला आज पर्यंत उर्वरित रक्कम न देता २ वर्ष निघून घेल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकरी आगोने यांनी पोलीस ठाणे गाठत व्यापारी कुलकर्णी यांच्यावर भा द वी कलाम ४०६,४२०,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांच्या निर्देशनानुसार पोलीस हे कॉ ओंकार सुतार हे करीत आहे.