सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची निराशा करणारा अर्थहीन अर्थसंकल्प आमदार मंगेश चव्हाण
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-अर्थसंकल्प जाहीर होताच आज ट्विटर च्या माध्यमातून हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांची निराशा करणारा अर्थहीन अर्थसंकल्प असल्याचे चाळीसगाव चे आमदार मंगेश यांनी म्हटले आहे.
कोरोना संकटानंतर राज्य सरकारचा पहिला अर्थसंकल्प असल्याने राज्यातील जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प असेल अशी अपेक्षा होती. मात्र २ लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची जाहीर केलेली कर्जमाफी व नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये अनुदान याबाबत अवाक्षर देखील अर्थमंत्री यांनी काढले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची कर्जमाफी फसवी असल्याचे सिद्ध होत आहे.
लॉकडाऊन काळात सर्वसामान्य जनतेला पाठविण्यात आलेल्या भरमसाठ बिलांच्या बाबतीत कुठलीही सूट दिली नाही. आपण दिलेला जनतेला शब्द देखील हे सरकार पाळू शकत नाहीत.
लॉकडाऊन मुळे राज्यतील कष्टकरी बारा बलुतेदार समाजाला मोठा फटका बसला होता मात्र त्यांना साहाय्य करण्यासाठी एकही योजना अथवा आर्थिक तरतूद केली गेली नाही.
कुठल्याही नव्या योजना जाहीर न करता केंद्र सरकारच्या मदतीने ज्या योजना सुरु आहेत त्यांचाच उल्लेख व अर्थमंत्री यांचे भाषण म्हणचे फडणवीस सरकारने सुरू केलेल्या योजनांचे वाचन होते.
अतितुटीचे खोरे असणाऱ्या गिरणा खोऱ्यासाठी संजीवनी ठरणारा नार – पार प्रकल्प यासाठी देखील भरीव तरतूद केली नसल्याने याबाबत सरकार गंभीर नसल्याचे दिसते.
शेजारील गुजरात राज्यात १० रुपये पेट्रोल स्वस्त असताना राज्याने त्यांच्या लिटर मागील २७ रुपये कर कमी करणे अपेक्षित होत मात्र त्यात देखील राज्याची निराशा झाली.
बोलाचाच भात बोलाचीच कढी अशी परिस्थिती आहे. एकंदरीत शेतकरी – कामगार – बारा बलुतेदार व सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची निराशा करणारा अर्थहीन अर्थसंकल्प असल्याचे चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्विटर वर ट्विट केले आहे.