विविध मागण्यांसाठी चाळीसगाव येथे सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)- देशातील केंद्र सरकार जाणीवपूर्वक जाती आधारीत जनगणना आणि ओबीसींची जातीआधारीत जन-गणना करण्यास नकार दिल्याबद्दल तसेच तीन कृषी कायदे आणि ईव्हीएमच्या विरोधात राष्ट्रीय पिछडा-वर्ग मोर्चाद्वारे टप्प्याटप्प्याने देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. चाळीसगाव येथील तहसीलदारांना दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी या देशातील केंद्र सरकार जाणीवपूर्वक जाती आधारीत जनगणना आणि ओबीसींची जातीआधारीत जनगणना करण्यास नकार दिला असून लवकरात लवकर जाती आधारित जनगणना झाली पाहिजे, तीन कृषी कायदे रद्द करत ईव्हीएमच्या वर बंदी आणत बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या पाहिजे अश्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले निवेदन देतांनी गोकुळ पाटील जिल्हा संघटक किसान मोर्चा,) प्रा.गौतम निकम ,अनिल वाल्मीक चौधरी( ठाकरे) जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी महाराष्ट्र प्रतिक तैलीक महासभा जळगाव जिल्हा तसेच अध्यक्ष तेली समाज युवा मंच चाळीसगाव, मुकेश नेतकर जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा सागर निकम चाळीसगाव तालुकाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना, अनिल महिराळे चाळीसगाव तालुका अध्यक्ष :आर.पी.आय राहुल मोरे, रमेश चौधरी,सागर धिवर, रुपेश पवार,गणेश निकम,मयूर खरात, शेख इत्यादी उपस्थित होते