दौंड कुरकूंभ एम,आय,डी,सी येथील कंपन्यामध्ये काम करणाऱ्या मजूर कर्मचऱ्यानां वेळेवर पगार व सुरक्षितेची साधने मिळत नसल्याबाबत रिपब्लिकन सेनेकडुन निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा.
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड कुरकूंभ एम,आय,डी,सी येथील कंपन्यामध्ये काम करणाऱ्या मजूर कर्मचऱ्यानां वेळेवर पगार व सुरक्षितेची साधने मिळत नसल्याबाबत रिपब्लिकन सेनेकडुन निवेदन देऊन आंदोलनाचा ईशारा.
सध्या जगामध्ये कोरोना या महाकाय संसर्ग रोगाने हाहाकार माजविला आहे.त्याच प्रमाणे मार्च 2020 पासून अनेक वेळा लॉकडाऊन करण्यात आले.देशात सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने जाहीर केलेल्या या लॉकडाऊन कालावधी दरम्यान सर्वत्र कार्यालये,कारखाने, फँक्टर्या,विवीध दूकाने ही पुर्णतहा बंद असल्याने लोकांच्या उत्पदनाचे मार्ग बंद होते व अजुन आहेत. या कळात उत्पनाचे कोणतेही साधन नव्हते व नाही. मौजे कुरकुंभ एम आय डी सी. ता.दौंड जि. पुणे. येथील कारखान्यातील अनेक परप्रातिय व बाहेर गावचे कामगार काम सोडून आपल्या गावी निघून गेलेले असल्याने एम,आय,डी,सीतील कारखाने बंद होण्याची वेळ आली होती. परंतू एम, आय डी सी हा केमीकल झोन असल्यामुळे येथे अनेक औषध निर्मीती करणारे कारखाने आहेत असे कारखाने बंद करणे शासनाच्या दृष्टिने परवडणारे नव्हते तसेच दौंडमधून अनेक युवती युवक हे मोट्या प्रमाणात पुणे व इतरत्र कामास जात होते त्यांना या लोकडाऊनच्या काळा मंध्ये बेकारिची कुर्हाड कोसळली होती. व त्यांच्यावर आत्महत्त्या करण्याची वेळ आली होती.अशा काळात कुरकुंभ एम आय डी सीत या युवक युवतींना कामास लावले आहे. तसेच कारखान्यांनी मजूल चे दर निश्चित करून जाण्यायेण्याची व्यवस्थाही करण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे कुरकुम एमाडिसी येथील कारखाने हे सध्यातरी अव्याहतपणे चालू आहेत म्हणजे चे कारखाने अव्याहतपणे चालू राहण्यामागे कारखान्यातील मजूर लोकांचा मोठा सहभाग आहे परंतु जर कामगारांना कारखान्याकडून त्यांच्या हक्काचे वेतन मजुरी वेळेवर देत नाही मिळणारी मजुरी शासन दरापेक्षा कमी दराने दिली जात आहे तसेच या कामगारांना कारखान्यावरील जाण्या- याची सोय केलेली नाही कारखान्यात जाण्यासाठी स्वखर्चाने जावे लागते मजुरांना हक्काची मजुरी भेटत नसल्याने त्यांना आपल्या हक्काचे मंजुरीशिवाय कारखान्यात काम कसे जावे व आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा हा मोठा प्रश्न या मजूर कामगारावर समोर उभा राहिला आहे तसेच या कारखान्यांमध्ये काम करीत असलेले अनेक मजूर कामगाराला सूरक्षतेच्या दृष्टीने सुरक्षतेची साधने पुरवली जात नाही.संरक्षणासाठी साधनेय स्वताच्या स्वखर्चाने करावे लागते.याबाबत व वेतन मजूरी बाबत विचारणा केली असता.कारखाना व कामगार ठेकेदार यांच्यात सामंजस्य दिसून येत नाही. यामुळे कामगारांचे काही बरे वाईट झाल्यास यास संबधीत कंपनी व ठेकेदार जबाबदार राहतील.तरी शासनाने या मजूरांच्या प्रश्नाकडेलक्ष द्यावे. यांची दखल रिपब्लिकन सेनेन निवेदन दिले. तसे न झाल्यास आदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना श्री.अनिल साळवे(प.महा.कामगार नेता), श्री.आनंद बगाडे(पुणे जि. उपाध्यक्ष),श्री.मोहन सोनवणे(दौंड तालूका अध्यक्ष),श्री..विशाल माशाळकर(अध्यक्ष जयमल्हार संघटना,दौड शहर),श्री.राजू गायकवाड(रि.से.दौंड तालूका कामगार सेना प्रमुख) हे उपस्थीत होते. हे निवेदन दौड तहसिलदार, दौंड पोलीस स्टेशन वमा.संचालक महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ कुरकुंभ यांना देण्यात आले.