संकटात ज्यांनी सात दिली त्यांनाच संकटात टाकून कसे चालणार-आमदार चव्हाण
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव(प्रतिनिधी)-कोरोना च्या संकटाशी दोन हात करता यावे या साठी कोरोना काळात जिल्हा व तालुका स्तरावर मानधन तत्वावर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या, त्यात त्यांना रोजगार मिळाला व त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडत कोरोना योद्धचा मान मिळविला मात्र चाळीसगाव तालुक्यातील 39 कर्मचारी कमी करण्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि 2 जुलै रोजी सांयकाळी आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांनी दिले आदेश प्राप्त होताच कर्मचारी मात्र सुन्न झाले दीड वर्ष रुग्णांची सेवा केली मात्र पूर्व सूचना न देता ,कोणतीही चर्चा न करता अचानकपणे कमी करण्यात आल्याने रोजगाराचे संकट उभे राहिले आहे अशी आपली व्यथा कर्मचाऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या समोर मंडळी आमदार चव्हाण यांनी समस्या समजून घेत आगामी अधिवेशनात मंत्रिमंडळाशी भेटून विषयावर चर्चा करणार असल्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले.
आमदार मंगेश चव्हाण यांची भेट |
एकी कडे शासन तिसर्या लाटेची आम्ही तयारी करत आहोत असे सांगत आहेत, जळगाव जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लादण्यात आले असताना मात्र प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांवर उपचार करण्यासाठी गरजेचे असणारे अनुभवी मनुष्यबळ मात्र कमी करत आहे. प्रशासनाची ही भूमिका दुटप्पी व अन्यायकारक असून भविष्यात तिसरी लाट आल्यास त्याचे गंभीर परिणाम जिल्ह्याला भोगावे लागतील संकटात ज्यांनी सात दिली त्यांनाच संकटात टाकून कसे चालणार . याबाबत आगामी अधिवेशन काळात मंत्री महोदयांना भेटून या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी कोव्हिडं १९ कंत्राटी कर्मचारी यांना दिले. |