अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि. १४ एप्रिल २०२६ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लिलामृत फाऊंडेशनतर्फे पसायदान आधार आश्रम येथे अन्नदानाचा स्तुत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत गरजू व वंचित घटकांसाठी स्नेहपूर्ण भोजनाचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनच्या सहकार्याने पुरणपोळीच्या भोजनाचा लाभ सुमारे ५० हून अधिक नागरिकांनी घेतला. या वेळी उपस्थित लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसून येत होता.
पसायदान आधार आश्रमाचे प्रमुख म्हणाले की, “अन्नदान ही सर्वश्रेष्ठ सेवा असून, गरजूंना आधार देणे हेच आमचे ध्येय आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव वाढीस लागतो.”
लिलामृत फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच स्वयंपाक, भोजन वाटप व स्वच्छता यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात फाऊंडेशनचे संचालक आयु. राहुल अमृत निकुंभ व त्यांच्या सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.
या अन्नदानाच्या पवित्र कार्यामुळे सामाजिक बांधिलकीचा उत्तम संदेश समाजापर्यंत पोहोचला असून, आश्रमाच्या सेवाभावी कार्याला अधिक बळ मिळाले आहे.
