गोड बोलणारे तर खूप आहेत,मात्र दिवाळी गोड करणारे आमदार मंगेश चव्हाण
संपादक गफ्फार मलिक
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)-आमदार मंगेश चव्हाण यांनी आपली ओळख तालुक्याचा हक्काचा पर्याय म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे,दिवाळी निमित्ताने आमदार चव्हाण यांनी आपली दिवाळी साजरा करतांना दि 24 ऑक्टोबर रोजी अनेकांची दिवाळी सुद्धा गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
आज लक्ष्मीपूजन दिवाळी या सणाची सुरवात चाळीसगांव तालुक्यातील वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या पत्नी,माता पिता यांना भेटवस्तू देत केली चाळीसगांव ही शहिदांची भूमी आहे. देशसेवा करत असताना वीरगतीला प्राप्त झालेल्या जवानांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी यावर्षीची दिवाळी शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत साजरी केली. आमदार चव्हाण यांच्याहस्ते साडी-कपडे, मिठाई, फराळ व फटाके आदींची किट शहीद कुटुंबाना भेट म्हणून देण्यात आली तसेच त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून सर्व चाळीसगांव तालुका तुमच्या सोबत आहे, काहीही अडचण आली तर कुटुंबातील सदस्य समजून मला कळवा असेही आमदार चव्हाण यांनी सांगितले. सोबतच बोन मॅरो या आजाराने ग्रस्त असलेल्या वरखेडे गावातील तरुण सागर कछवा याच्या उपचाराची जबाबदारी घेत त्याच्या जीवनात देखील गोडवा आणला, वाघळी येथे दुर्दैवी घटनेचा बळी ठरलेल्या स्व मोहन विजय हाडपे यांच्या कुटुंबियांना 1 लाखाची मदत केली व सोशल मीडियाच्या माध्यमाने दिवाळीच्या शुभेच्छा देत थिंक ग्लोबल,बाय लोकल असा संदेश देत यावर्षीची दिवाळी खरेदी स्थानिक दुकानदार, व्यापारी बांधवांकडूनच करावी अशी विनंती देखील केली आहे जेणे करून स्थानिकांची छोट्या मोठ्या दुकानदारांची देखील दिवाळी गोड होईल.
या प्रकारे आनंदाच्या सणात कोणी दुःखी राहायला नको ही आमदार चव्हाण यांची भूमिका मात्र जनसामान्यांचे मन जिंकणारी आहे,तालुक्यातील आमदार ते जनसामान्यांचे मागे उभे असणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्या कर्तृत्वातून एक गोष्ट लक्षात येते की गोड बोलणारे तर खूप असतात मात्र स्वखर्चाने दिवाळी गोड करणारे म्हणजे फक्त आमदार मंगेश चव्हाण.