Oplus_19005442
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि वाढलेल्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या चाळीसगावकरांना आज दिनांक 31 रविवारी सायंकाळी निसर्गाने मोठा दिलासा दिला. सायंकाळी सुमारे 5 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली.
दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहनचालक आणि पादचारी यांची काहीशी धावपळ उडाली. तर दुसरीकडे नागरिकांनी या पावसाचे स्वागत केले. पावसामुळे शहरातील वातावरण प्रसन्न झाले असून तापमानातही घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांनी या अवकाळी पावसाचा आनंद घेतला. अनेक ठिकाणी लहान मुले आणि युवक पावसात भिजताना दिसून आले. अचानक झालेल्या या पावसामुळे चाळीसगाव शहरासह परिसरात गारवा पसरला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
