विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दौंड येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
दौंड(प्रतिनिधी)-संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा त्यांचा संदेश आजच्या पिढीलाही तितकेच गरजेचे आणि आदर्श वाटतात.त्यांनी भारतातील समाजातील तळागळातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथल्या ऐतिहासिक समारंभात आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 64 वर्ष, 7 महिने होते. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यूनंतरची मुक्ती असा होतो, म्हणूनच त्यांचा स्मृतिदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. यादिवशी देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर जातात.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दौंड येथे देखील दि ६ डिसेंबर रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त प्रकाशभाऊ साळवे युवा मंच दौंड शहर व दौड तालुका (सामाजिक कार्यकर्ते ) यांच्या कडून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी दीपक पाटील(सामाजिक कार्यकर्ते), विशाल सोनवणे ( बहुजन समाज पार्टी तालुका अध्यक्ष ) व प्रवीण पोळ , विजय थोरात , राजेश ओहळ ,अनिल गायकवाड , नितीन बनसोडे ,श्रेयस सोनवणे , विनोंद शिंदे ,प्रकाश जगताप व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.