Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

कन्नड घाटात अपघात चार मृत्युमुखी तर सात जखमी

0
1 0
Read Time2 Minute, 48 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

 

चाळीसगाव(प्रतिनिधी)-कन्नड घाटात भीषण अपघात चार प्रवाश्यांचा मृत्यू तर सात जखमी झाले असून काल मध्यरात्रीनंतर तवेरा चालकाचा वाहणावरील नियंत्रण सुटून गाडी दरीत पडल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला आहे.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती नुसार कन्नड घाटातून जात असतांना एमएच ४१ व्ही ४८१६ या क्रमांकाच्या तवेरा गाडीच्या चालकाचा रात्री पाऊस व धुक्यामुळे अंदाज न आल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे कळते या भीषण अपघातात प्रकाश गुलाबराव शिर्के, (वय -६५); शिलाबाई प्रकाश शिर्के, (वय -६० ) ; वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी, (वय -३५) आणि पूर्वा गणेश देशमुख, (वय -०८) हे चार प्रवासी जागीच मयत झाले. तर, रूपाली गणेश देशमुख,वय ३०; अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०); कृष्णा वासुदेव शिर्के, (वय -४); जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी,( वय १७ ); सिध्देश पुरुषोत्तम पवार( वय १२ ) ;.पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय -३५) आणि अभय पोपटराव जैन, (वय ५०) हे सात जण जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. परिसरातून नागरिक आणि वाहन चालक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना चाळीसगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे दोन्ही बाजूने वाहने उभे राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, या भीषण अपघातामुळे कन्नड घाटातील वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

वाहनधारकांनी कन्नड घाटातून अतिशय सुरक्षितपणे वाहने चालविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: