नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ प्रोत्साहन अनुदान देण्याची रयत सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगाव(प्रतिनिधी) – शेतीसाठी घेतलेले कर्ज नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर करून जवळपास दोन महिने उलटून देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्यामुळे सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर राज्य सरकारने जाहीर केलेले प्रोत्साहन अनुदान नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसीलदार द्वारा दि १८ रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली असताना अनेक तालुक्यात मोजक्याच शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत प्रोत्साहन अनुदान शासनाने दिले नाही. राज्यात ओला दुष्काळाची परीस्थिती असताना देखील महसूल प्रशासनाने ५० टक्याच्या वर आणेवारी लावल्याने ओला दुष्काळाची परीस्थिती असून देखील शेतकऱ्यांना शासनाने एक रुपया देखील मदत केली नाही. शेतकऱ्यांचे शेत पिके खराब झाले असताना हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून गेला असूनही शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. सततच्या नुकसानीने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अगोदर घेतलेले कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या मुलाबाळांची दिवाळी सण देखील काळोखात गेली. मायबाप सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ प्रोत्साहन अनुदान देवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी. अन्यथा रयत सेना चाळीसगाव तहसील कार्यालय समोर तीव्र आंदोलन पुकारेल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास राज्य सरकार जबाबदार राहणार असल्याचे मुख्यमंत्री यांना चाळीसगाव नायब तहसीलदार धनराळे यांना दि १८ रोजी रयत सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाची प्रत खासदार जळगाव,आमदार चाळीसगाव,जिल्हाधिकारी जळगाव, प्रांताधिकारी चाळीसगाव,जिल्हा निबंधक जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश सहसंघटक ज्ञानेश्वर कोल्हे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे, शेतकरी सेना जिल्हाउपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण,शेतकरी सेना तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील,तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,संजय कर्पे,विलास मराठे,संघटक संजय राठोड,मार्गदर्शक डी एस मराठे,देवीदास जाधव,अमोल भोसले,मुकुंद पाटील, शहर अध्यक्ष छोटू अहिरे, शहर शिक्षक सेनेचे अध्यक्ष सचिन नागमोती, शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे,कार्याध्यक्ष दिपक देशमुख, कृष्णानगर सरपंच मनोज चव्हाण,तांबोळे शाखा अध्यक्ष विजय पाटील तर कुशल देशमुख, भिकन सोमवंशी, रणधीर जाधव, रवींद्र देशमुख, पप्पू घुले ,बाळू तांबटकर, भूषण पाटील ,सुनील परदेशी , विजयसिंग कच्छवा, दत्तात्रय पाटील, गणेश गोसावी, किरण पाटील, भगवान पाटील, नानासाहेब पाटील, संदीप पाटील ,कुलदीप पाटील, कैलास माने,गणेश देशमुख,राजेंद्र देठे तसेच मेरा गाव मेरा तीर्थचे खुशाल पाटील,वसुंधरा फाउंडेशन चे सचिन पवार यांच्यासह रयत सेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत