झी मराठी तर्फे “उंच माझा झोका” या कार्यक्रमात समाजसेविका श्रीमती मिनाक्षीताई निकम यांचा गौरव,चाळीसगांवच्या शिरपेचात पुनश्च मानाचा तुरा….
संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव येथील स्वतः दिव्यांग भगिनी असूनही दिव्यांगाच्या जिवनात प्रकाशाचा अखंड दिवा तेवत ठेऊन त्यांची खडतर वाट सुकर करणा-या समाजसेविका श्रीमती मिनाक्षीताई निकम यांना नुकतेच मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी झी मराठीतर्फे “उंच माझा झोका”या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुंबई येथे यथोचित सन्मान करुन गौरविण्यात आले.गेल्या ८ वर्षापासून झी मराठी हा उपक्रम राबवित असून दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७ महिलांचा सन्मान झी वाहिनीमार्फत केला जातो,चाळीसगावकर भाग्यवान असून आपल्या शिरपेचात हा मानाचा तुरा याआधी स्विटी पाटे व घाटे मॕडम यांना मिळालेला असून आता तिस-या वेळी चाळीसगावातील स्त्रीशक्ती चा गौरव होणे ख-या अर्थाने अभिमानास्पद आहे,मिनाक्षीताई निकम यांच्या अनंत समाजकार्याचे मोजमाप शब्दात व्यक्त होणे शक्यच नाही,त्यांनी आपल्या स्वंयदिप फाऊंडेशनतर्फे महिला उद्योगिनी परिवाराची मुहूर्तमेढ रोऊन अनेक दिव्यांग भगिनींना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे अवघड शिवधनुष्य पेलले असून माझ्यानंतरही माझ्या भगिनी स्वतःच्या पायावरच उभ्या राहतील हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न व जिद्द आहे,नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी जळगाव अभिजीत राऊत यांनी ३१ हजार तिरंगा ध्वज बनविण्यासाठी दिलेली जवाबदारी मिनाक्षी ताईंनी आपल्या सहकाऱ्यांसह हिमतीने पार पाडली हे ही कौतुकास्पदच आहे,शेवटी अशा दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलेचा सन्मान झी मराठीसारख्या अग्रगण्य वाहिनीकडून होतो हे निश्चितच भूषणावह आहे, कार्यक्रमाचे आयोजक यांनी चाळीसगाव सारख्या तालुका स्तरावरील शहरात हि-यांची खाण असून, महाराष्ट्रातील तालुक्यांमधून हा पुरस्कार तिस-यांदा मिळविणारे चाळीसगाव एकमेव आहे असे सांगितले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मंत्री आमदार श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी केले असून,मुंबई महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.उज्वला चक्रदेव व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यासाठी सन्मानचिन्ह,मानपत्र व नंतरच्या काळात संस्थेला भरिव मदत या स्वरुपात देण्यात आला आहे,यावेळी मराठीतील आघाडीची अभिनेत्री क्रांती रेडकर सह अनेक कलाकारही उपस्थित होते,सदरिल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण येत्या २८ आॕगस्ट रविवार रोजी सायंकाळी झी मराठी वाहिनीवरील दिमाखदार सोहळ्यात केले जाणार आहे,तो क्षण निश्चितच चाळीसगावकरांसाठी अभिमानास्पद व भूषणावह असेल यात तिळमात्र शंका नाही.